माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

शैक्षणिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शैक्षणिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १६ जुलै, २०२०

जुलै १६, २०२०

डॉक्टरनीच भूल उतरवणारा लेख लिहिला

डॉक्टरनीच भूल उतरवणारा  लेख लिहिला

वैद्यकीय व्यवसायाचा कॉर्पोरेट धंदा..
 
डॉ सचिन लांडगे. भुलतज्ञ, अहमदनगर.

हॉटेल टाकण्यासाठी तुम्ही आचारी असण्याची गरज नाही, तसंच हॉस्पिटल टाकण्यासाठी पण तुम्ही डॉक्टर असण्याची गरज नसते..

ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसते.. पण मोठया मोठया उद्योगपतींना हे चांगलंच माहिती होतं.. मग त्यांनी टोलेजंग कॉर्पोरेट हॉस्पिटल्स टाकली आणि त्याचा "मनी मेकिंग बिझनेस" बनवायला सुरुवात केली.. तिकडे जाणारा आधीचा श्रीमंत क्लास तर होताच, पण त्यात नुकताच उदयास आलेला नवमध्यमवर्ग जास्त कॅच केला गेला.. जागतिकीकरणा मुळे सुबत्ता येत होती त्याचा फायदा उचलला.. सोबत कॅशलेस मेडिक्लेम कंपन्यांचं जाळं वाढवायला पद्धतशीर सुरुवात केली गेली.. आजारांच्या आणि मरणाच्या भीतीचं मार्केटिंग केलं जाऊ लागलं.. आपल्याला लक्षात येत असेलच की 1992 पासून खूप गोष्टी कमालीच्या बदलत गेल्यात..

मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलचा डोलारा सांभाळायचा तर मग मेंटेनन्स पण झेपला पाहिजे, त्यासाठी पेशन्ट इनपुट जास्त पाहिजे.. मग त्यासाठी सगळे मार्केटिंग स्किल्स वापरले गेले.. कॉर्पोरेट् हॉस्पिटलचे पॅम्प्लेट्स गावोगावी वाटले जाऊ लागले.. पेशन्ट कॅचमेण्टसाठी फ्री कॅम्प ठेवले जाऊ लागले, गरज नसताना (प्रिकॉशन म्हणून) तपासण्या सजेस्ट केल्या जाऊ लागल्या.. लोकंही "जरा सगळ्या बॉडीचं चेकप करा बरं" म्हणून भुलू लागले.. PRO गावंशहरातल्या डॉक्टर्सचे उंबरे झिजवू लागले.. कमिशनचं आमिष देऊ लागले.. 
आता वाडीवस्तीवरचा पेशन्ट पण डायरेक्ट पुण्यामुंबईला जाऊ लागला आणि "म्हातारीच्या इलाजासाठी वावर इकलं, पण नीटच करून आणली" हे अभिमानाने सांगू लागला..

जेवढा तुमच्याकडं पैसा जास्ती, तेवढं मोठं हॉस्पिटल निवडलं जाऊ लागलं.. आणि जेवढं मोठं हॉस्पिटल तेवढा अभिमान जास्ती वाटू लागला.. काहींना तर छोट्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची लाज वाटू लागली.. त्यात इन्शुरन्स असेल तर बोलायलाच नको.. 

कमी पैशात सर्व उपचार हवेत तर ऍडजस्ट केलं पाहिजे, हे विसरून, "तुमच्याकडे ऍडमिट होतोय तर उपकार करतोय", ही भावना वाढीस लागली.. त्यातूनच पेशंटचं काही बरंवाईट झालं तर मारणं धमकावणं नित्याचं झालं..
असो..

मग कॉर्पोरेट लॉबीनं फार्मा कंपन्यांना आणि सरकारला हाताशी धरलं.. सरकारातून आपल्या पथ्यावरचे कायदे आणि नियम करून घ्यायला सुरुवात केली..

Consumer Protection Act नं तर खूप परिस्थिती चिघळवली.. डॉक्टरांनी क्लीनिकल जजमेंटची साथ सोडली, आणि सगळं इन्व्हेस्टिगेशन बेस्ड होऊ लागलं.. तपासण्यांना महत्व आलं..  मग उपचाराचा खर्च वाढला.. त्याचा परिणाम म्हणून, समाजाचा डॉक्टरांवर संशय वाढला आणि डॉक्टरांचा समाजावरचा विश्वास कमी झाला..

पण अजूनही छोट्या आणि मध्यम आकाराच्या हॉस्पिटल्स मधून खात्रीशीर आणि रास्त भावात सेवा मिळतच् होती.. मग आला CEA.. Clinical Establishments Act.. त्यानं तर मध्यम आणि छोट्या हॉस्पिटल्सचं कंबरडंच मोडलं.. हॉस्पिटल कसं असावं याचे युरोपातल्या धर्तीवर बनविलेले नियम लागू केले गेले.. तिथले 'स्टँर्डडस' जसेच्या तसे लागू केले गेले.. तिथली ट्रीटमेंट कॉस्टिंग आणि इथली परिस्थिती याचा विचारच केला गेला नाही..  
कायद्याप्रमाणे सगळे नॉर्मस् पाळायचे म्हणलं तर छोट्या हॉस्पिटलना अजिबात शक्य नाही, किंवा मग उपचाराचा खर्च तरी अव्वाच्यासव्वा वाढतो.. मग समाजासाठी पुन्हा डॉक्टरच रडारवर.. 

अलीकडे छोट्या आणि मध्यम हॉस्पिटल्ससाठी प्रॅक्टिस करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय.. स्वतःचं हॉस्पिटल टाकायची हिम्मतच बहुतांश जण करत नाहीत.. मग काय, व्हा कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन.. आणि डावही तोच आहे..

कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स हे फक्त प्यादे म्हणून वापरले जातात , तिथे कन्सल्टंट म्हणून राहायचे असेल तर मंथली टार्गेट कंप्लिट करावे लागते.. हॉस्पिटलला किती बिझनेस करून दिला, यावर त्या डॉक्टरचे तिथले भवितव्य अवलंबून राहते.. बिलिंग डॉक्टरांच्या हातात नसतंच.. लोकांना वाटतं तिथं डॉक्टरच लुटतात, पण ते मॅनेजमेंट कडून लुटले जात असतात.. 

पण तरीही तिथे जॉईन राहण्याशिवाय कित्येक स्पेशालिस्ट आणि सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांकडे पर्यायच् नसतो.. कारण स्वतःचं सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल काढणं हे बहुतांश डॉक्टरांना परवडणारं नसतं..

ही सगळी सिस्टिम खरंतर आपणच जन्माला घातली आहे.. छोटे दवाखाने, छोटे नर्सिंग होम, फॅमिली डॉक्टर या सगळ्या संकल्पनांचा बळी देऊन..!

त्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला - सरकार नवनवीन कायदे आणतंय की ज्याची पूर्तता करणे वैयक्तिकरित्या डॉक्टरला बहुतेक वेळा शक्यच् होत नाही.. त्यामुळे छोटी हॉस्पिटल्स बंद पडत चालली आहेत.. त्यात डॉक्टरांवर होणारे हल्ले - त्यामुळे वैयक्तिक हॉस्पिटल्स काढण्यापासून डॉक्टर्स पळ काढायला लागले आहेत..

Mediclaim वाले तर छोट्या हॉस्पिटलवाल्यांना कॅशलेससाठी दारात पण उभे राहू देत नाहीत, कॅशलेससाठी आता NABH accredition कंपल्सरी होत चाललंय.. की जे छोट्या हॉस्पिटल्सना शक्य होणार नाही.. त्यामुळे छोटे हॉस्पिटल्स अजूनच् खचत जाणार आहेत.. 

मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टरही भरपूर प्रमाणात आणि कमी पगारात उपलब्ध व्हायला हवेतच.. यासाठी सरकारचं खाजगी वैद्यकीय शिक्षणाबद्दलचं धोरण त्यासाठी कॉर्पोरेट लॉबीच्या पथ्यावरच पडलं..  
समाजात डॉक्टर्सची संख्या कमी आहे म्हणून सरकारी कॉलेजेस वाढविण्यापेक्षा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचं कुरण चरायला मोकळं केलं गेलं, आणि डॉक्टरांचं भरमसाठ उत्पादन सुरू झालं.. आणि त्यातून अमाप पैसा ओतून जे डॉक्टर झाले, ते एक तर कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन झाले किंवा आपापली हॉस्पिटल्स टाकून हप्ते फेडत बसले..
MBBS साठी पन्नास लाख डोनेशन आणि पुढे PG साठी एक ते दोन कोटी डोनेशन देऊन शिक्षण घेतलेला, चारपाच गुंठ्यांच्या हॉस्पिटलसाठी दीड कोटी आणि बिल्डिंगसाठी एक कोटी मोजलेल्या, आणि सर्व सोयीनींयुक्त हॉस्पिटल टाकलेल्या डॉक्टरला "तू समाजाची सेवा कर" असं तुम्ही कोणत्या तोंडाने म्हणणार आहात..? त्याला काय सबसिडाईझड् मिळालंय किंवा मिळतंय की त्यानं समाजाची सेवा करावी..? कोणी चालू केली ही खाजगी मेडिकल कॉलेजेसची दुकानदारी? समाज तेंव्हा चूप का होता? डॉक्टरांची संख्या कमी आहे म्हणून सरकारी सीट्स वाढविण्यापेक्षा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला परमिशन देण्यामागे समाजाचं भलं करण्याचा एक टक्का तरी हेतू दिसतो का कोणाला??
असो..

कमर्शिअल रेटने वीज पाणी वापरायचं, सरकारकडे व्यावसायिक कर भरायचे, पण पेशंटच्या बिलात मात्र कमर्शियलायझेशन करायचं नाही.. सगळ्या मशीनरी महाग आणि त्यातही किमतीच्या जवळपास दीड पट टॅक्स भरायचे, पण बिलात मात्र कमर्शियलायझेशन करायचं नाही..

लोकांना वाटतं डॉक्टर खोऱ्याने ओढतात.. पण खोरे असण्याचे दिवस गेलेत..
प्रत्येक स्पेशालिटीत शंभरात दहाबारा जणच् चांगलं कमवित असतात, आणि समाजाच्या डोळ्यासमोर तेच येतात.. आणि मग जनरलाईझ्ड स्टेटमेंट होते की डॉक्टर लोक खोऱ्याने ओढतात म्हणून..
खरंतर निम्म्याहून अधिक जण हॉस्पिटलचा मेंटेनन्स आणि इन्कम याची सांगड घालायला झगडत असतात..

सरकार दरबारी कुठलीच कामं बिना पैसे देता होत नाहीत.. टेबलावरचा कागद पण हालत नाही.. अक्षरशः एकही परवानगी किंवा सर्टिफिकेट बिना पैसे देता मिळत नाही.. उलट डॉक्टर म्हणलं की चार पैसे जास्तच मागतात पालिकेत.. आणि वर, "तुम्हाला काय कमी आहे राव" असं दात काढून म्हणतात.. तरीही डॉक्टरनी "सेवा"च करायची..

डॉक्टर हा सुद्धा या समाजाचाच भाग आहे.. समाजाची मानसिकता आणि नैतिकता या दोन्ही गोष्टी डॉक्टरांत पण प्रतिबिंबित होतातच.. डॉक्टरांची नैतिकता घसरणे, दुष्प्रवृत्ती वाढीस लागणे हे त्याचंच फलित आहे.. समाज मात्र यासाठी डॉक्टरांना एकतर्फी जबाबदार धरतो, आणि स्वतःच्या जबाबदारीतुन अंग काढून घेतो..

अलीकडच्या काळात पेशन्ट फक्त चांगली ट्रीटमेंट दिल्याने खुश होत नाहीत, त्यांना पाहिजे त्या सोयी हॉस्पिटलमध्ये पुरवता पुरवता आधीच नाकी नऊ येतंय.. त्यात ट्रेनड् स्टाफ मिळत नाही, NABH मिळत नाही, कॅशलेस फॅसिलिटी मिळत नाही, रेफरल चार्जेस द्यायचे नाहीत, आणि वर स्वतःची जाहिरातही करायची नाही.. मग छोट्या हॉस्पिटल्सनी ह्या मल्टीस्पेशालिटी आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल्स समोर कशी तग धरायची सांगा..?

येणारा काळ हा पूर्णपणे मल्टीस्पेशालिटी कॉर्पोरेट हॉस्पिटल्सचा असणार आहे.. पण तोपर्यंत मेडिकल फिल्डचं बरंच चारित्र्यहनन झालेलं असेल.. आणि छोट्या हॉस्पिटल्सचा पूर्णपणे बळी गेलेला असेल..

 डॉ सचिन लांडगे. भुलतज्ञ, अहमदनगर.
.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 कृपया पोस्ट वाचून झाल्यानंतर आवडल्यास नक्की शेअर करा व इतरांनाही वाचण्याचा आनंद घेऊ द्या.

मंगळवार, १४ जुलै, २०२०

जुलै १४, २०२०

अपघाती_मृत्यू : कायद्यातील तरतूदी Accidental Death & Compensation: (Income Tax Return Required)

*अपघाती_मृत्यू : कायद्यातील तरतूदी*
Accidental Death & Compensation:
(Income Tax Return Required)


जर कोणत्याही व्यक्तिला अपघाती मृत्यु ओढवल्यास आणि ती व्यक्ति सलग मागील ३ वर्षांचे ITR (Income tax return) नोंदणी (फाईल) करत असेल तर त्याला त्या तीन वर्षांचे सरासरी प्रमाणाच्या १० पटीत रक्कम त्याच्या परिवाराला देण्यास सरकारला बंधनकारक आहे.
हा एक सरकारी नियम / लिखीत तरतूद आहे. 
(खाली कायदा सेक्शन नंबर नमूद केला आहे)

उदाहरण दाखल: अपघात झालेल्या माणसाची मागील ३ वर्षांची वार्षिक मिळकत आय : ४ लाख, ५ लाख, ६ लाख असा असेल.
तर त्या ३ही वर्षांचे सरासरी होणार ५ लाख रूपये आणि त्याच्या १०पट म्हणजेच ५० लाख रूपये सरकार कडून घेण्याचा अधिकार प्रत्येक आयटिआर भरणार्या व्यक्तिच्या परिवाराला आहे.

बर्याचवेळेस माहिती नसल्याचा अभाव किंवा कायद्यातील गैरसमज ह्यामुळे कोणी सरकारी दरवाजे ठोकत नाही
पण आपण आपला अधिकार हा घेअलाच पाहिजे.
मान्य की मयत व्यक्तिची जागा ह्या पैशातून नक्कीच भरून निघणार नाही पण भविष्यातील काही काळतरी सुखकर जाईल.

जरी सलग ३ वर्ष ITR returns दाखल केले नसेल तर, परिवाराला पैसा मिळणार नाही असे काही नाही; पण अशा परिस्थितीत सरकार कडून एखाद दिड लाख देऊन केस बंद केली जाते. पण जर ३ वर्षाचे सलग फाईलींग नोंद असेल तर ह्या स्थितीत बाजू आणखीन बळकट बनते आणि असे समजले जाते की मयत व्यक्ति त्या परिवाराची कमवणारी व्यक्ति होती. जर ती जिवंत राहीली असती तर त्याच्या परिवाराला ती पुढील १० वर्षामध्ये आताच्या वार्षिक आयच्या १० पट कमवले दिले असते आणि कुटुंबाचे व्यवस्थित पालन पोषणही केले असते.

आपल्यापैकी नोकरी (सर्विस) करणारे बरेच लोग आहेत आणि ते कमवणारे सुद्धा आहेत परंतू , त्यातील बहुतांशी लोक ITR (Return filing) नोंदवत नाही. 
अशाने कंपनीद्वारे कपात केलेला हक्काचा पैसा सरकार कडून आपण परत घेत नाही आणि तसेच अशा अपघाती मृत्यूनंतर परिजनांना आपल्या पछ्यातही काही आर्थिक लाभ नाही.

माझ्या काही मित्रपरिवारात / ओळखीत अपघाती मृत्यू अशा बर्याच घटना घडल्या पण माहिती अभावी त्यांच्या कुटूंबांना ह्या संधी पासून मुकावे लागले, म्हणून ही माहिती पोस्ट रूपात आपल्या समोर मांडली आहे. 

Source - *Section 166 of the Motor act, 1988 (Supreme Court Judgment under Civil Appeal No. 9858 of 2013, arising out of SLP (C) No. 1056 of 2008) Dt 31 Oct 2013.*
-----------------------------------------------------------------------

टिप: सर्व नोकरवर्गांनी ITR कायम भरला पाहिजे आपल्याला टँक्स पडो अथवा ना पडो. जर आपण आता पर्यंत नोंदणी केली नसल्यास, एकत्रित 2 ही वर्षाचे पण फायलिंग करू शकता





*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 
👨🏻‍🦳👨‍👩‍👧‍👦🙆🏻‍♂ 
पोस्ट आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा व त्यांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या . सबस्क्राइब करायला विसरू नका आपल्या व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडियावर नक्की शेअर करा धन्यवाद

रविवार, १४ जून, २०२०

जून १४, २०२०

गणितातील काही महत्वाची एकके* :

  • 💢  *गणितातील काही महत्वाची एकेके* :                   
  • (१)    १  मिनिट = ६० सेकंद .
  • (२)    १  तास = ६० मिनिटे .
  • (३)    २४ तास  = १ दिवस .
  • (४)    पाव तास =१५ मिनिटे. 
  • (५)    अर्धा तास =३० मिनिटे. 
  • (६)     पाऊण तास= ४५ मिनिटे .
  • (७)     ७ दिवस = १ आठवडा.
  • (८)     ३० दिवस = १ महिना.
  • (९)     ३६५ दिवस =१ वर्ष .
  • (१०)   १० वर्ष = १ दशक .
  • (११)   अर्धा वर्ष = ६ महिने .
  • (१२)   पाव वर्षे = ३ महिने .
  • (१३)    १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात.
  • (१४)    २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात .
  • (१५)    एकशे =१००
  • (१६)    अर्धाशे =५०
  • (१७)    पावशे =२५
  • (१८)    पाऊणशे =७५
  • (१९)    सव्वाशे =१२५ 
  • (२०)    दीडशे = १५०
  • (२१)    अडीचशे =२५०
  • (२२)    साडेतीनशे =३५०
  • (२३)    १डझन=  १२ वस्तू 
  • (२४)    अर्धा डझन =६ वस्तू  .
  • (२५)    पाव डझन=३ वस्तू
  • (२६)    पाऊण डझन=९ वस्तू 
  • (२७)    २४ कागद = १ दस्ता
  • (२८)    २० दस्ते=१ रीम
  • (२९)    ४८० कागद = १  रीम
  • (३०)   १ गुंठे=  १०८९ चौ .मी
  • (३१)    १ हेक्टर =१०० आर
  • ३२ )    १एकर= ४००० चौ .मी 
  • (३३)   १मीटर= १०० सेंटिमीटर 
  • (३४)    अर्धा  मीटर= ५० सेंटिमीटर 
  • (३५)    पाव मीटर = २५ सेंटिमीटर 
  • (३६)    पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर 
  • (३७)   १ लीटर = १००० मिलिलीटर
  • (३८)   अर्धा  लीटर= ५०० मिलिलीटर
  • (३९)    पाव लीटर = २५० मिलिलीटर
  • (४०)    पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर
  • (४१)    १ किलोग्रॅम = १०००  ग्रॅम
  • (४२)    अर्धा  किलोग्रॅम=५०० ग्रँम 
  • (४३)    पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम
  • (४४)    पाऊण किलोग्रॅम = ७५० ग्रँम
  • (४५)    १ किलोमीटर = १००० मीटर
  • (४६)    अर्धा  किलोमीटर  =५०० मीटर 
  • (४७)    पाव  किलोमीटर =२५० मीटर
  • (४८)    पाऊण किलोमीटर =७५० मीटर 
  • (४९)   १हजार=१०००
  • (५०)   अर्धा  हजार =५००
  • (५१)   पाव हजार =२५०
  • (५२)   पाऊण हजार  =७५०
  • (५३)   १२ इंच =१ फूट  
  • (५४)   ३ फूट =१ यार्ड
  • (५५)   १ मैल =५२८० फूट 
  • (५६)   १ क्विंटल =१०० किलोग्रॅम 
  • (५७)   अर्धा  क्विंटल =५० किलोग्रॅम 
  • (५८)   पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम 
  • (५९)   पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम 
  • (६०)   १ टन= १० क्विंटल 
  • (६१)   १  टन= १००० कि.ग्रॅ

बुधवार, १० जून, २०२०

जून १०, २०२०

जॉनी लिव्हर

जॉनी लिवर.....कसा घडला तो..

जगातील सर्वात मोठी म्हणून गाजलेल्या धारावी झोपडपट्टी मध्ये एक १०-१२ वर्षांचा, काळासावळा व दिसायलाही ओबडधोबड असा 'जॉन प्रकाश ' लहानाचा मोठा झाला.
घरात पाच भावंड होती. तीन बहिणी,दोन भाऊ. त्यात तो सर्वात मोठा. घरची गरीब परिस्थिती. त्यामुळे सातवी उत्तीर्ण झाल्यावर त्याला शाळा सोडावी लागली. २-३ वर्षे तो मुंबईत रस्त्यावर पेन विकायचा.तेव्हा तो वेगवेगळ्या सिनेकलाकारांचे आवाज काढायचा. त्यामुळे पेन खरेदी करण्यासाठी नव्हे तर ते आवाज ऐकण्यासाठी खूप गर्दी जमायची.
त्याचे वडील 'हिंदुस्तान लिवर 'मध्ये मजुरी करायचे.

त्यांनी त्यालाही वयाच्या बाराव्या वर्षी मजूर म्हणून तिथे चिकटवला. लंच टाईममध्ये तो मिमीक्री करून कामगारांची खूप करमणूक करायचा. त्यामुळे तो सर्वांचाच आवडता झाला होता. धारावीमध्ये सगळ्याच गणेशोत्सवात त्याला मिमीक्रीसाठी बोलावलं जाई. पोट धरून हसायला लावणारी त्याची कॉमेडी ऐकून श्रोते त्याच्यावर अक्षरशः फिदा होत.
अनेकांनी त्याला शोसाठी आमंत्रण दिलं. कंपनीमध्येही विशेष समारंभ असला की तो त्याची कला सादर करायचा.कामगारांनी तर त्यांच्या हिंदुस्तान लिवर कंपनीमधील 'लिवर' त्याच्या नावाला जोडून त्याला 'जॉनी लिवर' हे टोपण नाव दिलं. तेव्हा जॉनी लिवर हे नाव देशातील लाखो करोडो जणांना पोट धरून हसायला लावणार आहे व तो शेकडो चित्रपटात अभिनय करणार आहे, असं स्वप्नातही कुणाला वाटलं नसणार.अनेक ठिकाणी मिमीक्रीचे शो केल्यामुळे एक दिवस जॉनी लिवर संगीतकार कल्याणजी आनंदजींच्या नजरेस पडला.त्याच्या मिमीक्रीवर ते इतके फिदा झाले,की त्यांनी त्याला त्यांच्या "कल्याणजी आनंदजी शो " साठी परदेश दौ-यावर नेलं आणि जॉनी लिवर नाव देश विदेशातही गाजू लागलं. आजही जॉनी लिवर त्यांना त्यांचा 'गॉडडफादर ' मानतो. त्यांच्यामुळेच त्याला १९८० मध्ये चित्रपटात भूमिका मिळाली.

पण मिमीक्री कलाकार चांगला कलाकार असू शकत नाही असा ठाम समज असलेल्या बॉलीवूडने त्याला नंतर भूमिका दिल्या नाहीत. तब्बल बारा वर्षे त्याला त्यासाठी अथक संघर्ष करावा लागला.१९९२ मध्ये आलेल्या 'बाजीगर' मधील त्याच्या भूमिकेमुळे अनेक निर्माते त्याचे उंबरठे झिजवू लागले होते. तब्बल १३ वेळा त्याला 'फिल्मफ़ेअर' पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं. दोन वेळा त्याला ते मिळालही. तोपर्यंत जॉनी एका चित्रपटासाठी मोजून तीस लाख घेऊ लागला होता. दरवर्षी तो ५-६ चित्रपटात तरी असायचाच.

यशाच्या शिखरावर असतानाही तो धारावीतील त्याच्या गरीब मित्रांना खूप मदत करायचा. कोणाच्याही अडीअडचणीला सढळ हाताने मदत करायचा. तब्बल ३०० चित्रपटांमध्ये त्याने विनोदी भूमिका केल्या. जॉनीचं विमान गगनात भरारी घेतच होतं. पण अकस्मात त्याच्यावर आभाळच कोसळलं. त्याच्या १० वर्षाच्या मुलाला २००० मध्ये कॅन्सर झाला व जॉनी कोसळून पडला. मुलाच्या मानेवरील ट्युमर दिवसेंदिवस वाढू लागला. जॉनीने काम करणच बंद केलं. नानावटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ट्युमर काढला तर मुलाला पैरालिसिस होईल किंवा त्याची वाचा जाऊ शकते,हे सांगितलं.

त्या दिवशी देशातील करोडो लोकांना पोट धरून हसवणारा जॉनी ढसाढसा रडला.
मानेवरचा ट्युमर मुलगा शाळेत जाताना कॉलरमागे लपवायचा तेव्हा जॉनी शोकाकुल व्हायचा. एक दिवस त्याला कोणीतरी अमेरिकेतील डॉक्टर जतिन शाहंचं नाव सांगितलं व जॉनी त्याच्या मुलाला घेऊन अमेरिकेला गेला. त्यांनी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला पण देवाची प्रार्थना करायला सांगितली.त्या दिवशी जॉनी देवाला अक्षरशः शरण गेला. भरलेल्या डोळ्यांनी त्याने देवाकडे मुलासाठी प्रार्थना केली. खरोखरच जॉनीला देव पावला. ऑपरेशन यशस्वी झालं. त्यानंतर मुलगा बरा झाला. त्या दिवसापासून जॉनीने कधी दारूला स्पर्श केला नाही. सिगारेट कधी हातात धरली नाही. डोक्यात कधी वाईट विचारांना थारा दिला नाही.

मित्रानो, आम्ही कुठल्या परिस्थितीत जन्मलो, यामुळे खरं तर काही फरक पडत नाही. आमच्यातील अंगभूत गुणच आम्हाला यशाकडे घेऊन जात असतात. फक्त त्या गुणांना चांगलं खत पाणी घालून प्रचंड मेहनत घ्यायची एवढच लक्षात
ठेवायचं. कठीण परिस्थितीत जॉनी लिवरने जे यश मिळवलं, ते आम्हाला नक्कीच प्रेरणा देत राहील व संकटाचा सामना करताना देवावर विश्वास ठेऊन हिंमत न हारता लढत राहाण्याचं बळ देईल...??? 

हे वाचल्यावर तुमच्या जगण्याला नवी दिशा मिळेल.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कृपया पोस्ट वाचल्यानंतर शेअर करायला विसरू नका इतरांनाही वाचनाचा मराठी भाषेच्या गोडीचा आनंद घेऊ द्या

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐