माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

वडील लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वडील लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २३ जून, २०२०

जून २३, २०२०

तत्वनिष्ठ बाप...शरदराव

*कृपया कितीही Busy असाल तरी,*
*ही पोस्ट एकदा नक्की वाचा अगदी निवांत तुमच्या जिवनात 1000% फरक पडनार* 🙏
              पोस्ट चे लेखक माहीत नाहीत .
      
            *तत्त्वनिष्ठ*
 
"अहो ऐकलंत का? राहूलचा डबा नेऊन देता का जरा कंपनीत?"

"का राहूलने नेला नाही डबा?" शरदरावांनी विचारलं.

" आज राहूलच्या कंपनीचे चेअरमन येत आहेत म्हणून राहूल सकाळी सातलाच गेलाय कंपनीत."त्यामुळे सकाळी लवकर  डबा तयार नाही झाला.

"ठीक आहे. देतो मी नेऊन."
शरदरावांनी हातातला पेपर बाजूला ठेवला आणि ते कपडे घालण्यासाठी आतमध्ये गेले.
पुष्पाबाईंनी सुटकेचा निःश्वास सोडला.

शरदराव तयार झाले म्हणजे त्यांचा आणि राहूलचा झालेला वाद त्यांनी ऐकला नव्हता. वाद कसला, राहूलचं नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांवर आगपाखड करणं आणि पुष्पाबाईंचं नवऱ्याची बाजू घेणं. विषयही तोच 'वडिलांनी आमच्यासाठी काही केलं नाही.' काय केल माझ्यासाठी बापाने हा चुकीचा समज त्याच्या मनात रुजला होता,

"आई माझ्या मित्राचे वडीलही शिक्षक होते, पण किती मोठा बंगला बांधलाय् बघ. नाहीतर नाना! अजूनही आम्हांला भाड्याच्या घरात ठेवत आहेत."
राहूल तावातावाने बोलत होता.

"राहूल तुला माहीत आहे की नाना घरात मोठे. त्यामुळे दोन बहिणी आणि दोन भावांची लग्नं त्यांनाच करावी लागली. शिवाय तुझ्या बहिणींची लग्नंही त्यांनीच केली. आपल्या शेताच्या कोर्टकचेऱ्या सुरू होत्या. अशा सगळ्या जबाबदाऱ्या होत्या. कुणी पार पाडल्या त्या?"

 "काय उपयोग झाला त्याचा?त्यांचे भाऊबहीण बंगल्यात राहात आहेत. कधीतरी वाटतं का त्यांना की आपला भाऊ आपल्यासाठी खस्ता खाताना साधं घर बांधू शकला नाही तर आपण त्याला घर बांधून द्यावं?"

क्षणभर पुष्पाताईच्या डोळ्यातून पाणी आले, काय बोलावं जन्म दिलेला मुलगा बापाने काय केले माझ्यासाठी विचारतोय . मग म्हणाल्या,
"तुझ्या वडिलांनी त्यांचं कर्तव्य केलं. भावाबहिणींकडून कधीही अपेक्षा बाळगली नाही."

"राहूल मुर्खा सारखे म्हणत होता बरं ते ठीक आहे. हजारो मुलांच्या नानांनी ट्युशन्स घेतल्या. त्यांच्याकडून जर फी घेतली असती तर आज नाना पैशात लोळले असते. आजकालचे क्लासवाले पाहा. इंपोर्टेड गाड्यांत फिरतात."

"हे तू बरोबर म्हणतो आहेस. पण नानांचं तत्त्व होतं, ज्ञानदानाचे पैसे घ्यायचे नाहीत म्हणून. या त्यांच्या तत्त्वामुळेच तर ते किती प्रसिद्ध होते. किती पुरस्कार मिळाले आहेत त्यांना कल्पना आहे तुला?"

ते ऐकताच राहूल एकदम संतापला. "काय चाटायचे आहेत ते पुरस्कार आई? त्या पुरस्कारांनी घर थोडीच बांधता येतं? पडले आहेत धूळ खात!कोणी विचारत नाही त्यांना!"

तेवढ्यात दार वाजलं. राहूलने दार उघडलं तर शरदराव उभे होते. वडिलांनी आपलं बोलणं ऐकलं तर नाही ना या भीतीने राहूलचा चेहरा उतरला. पण शरदराव न बोलता आत निघून गेले आणि तो वाद तिथंच संपला.
हे होते पुष्पाताई व राहूलचे कालचे  भांडण , पण आज 
शरदरावांनी सायकलला डबा अडकवला आणि भर उन्हात ते औद्योगिक वसाहतीतल्या राहूलच्या कंपनीकडे निघाले. सात किलोमिटरवरच्या कंपनीत पोहचता पोहचता त्यांना चांगलीच धाप लागली होती. कंपनीच्या गेटवर पोहचल्यावर सिक्युरिटी गार्डने त्यांना अडवलं.

"राहूल पाटील साहेबांना डबा द्यायचा होता. जाऊ का आत?"

"आता नाही देता येणार.." गार्ड म्हणाला, "चेअरमनसाहेब आलेत. त्यांच्यासोबत मिटींग सुरू आहे. कोणत्याही क्षणी ते मिटींग संपवून बाहेर येतील. तुम्ही बाजूला थांबा. चेअरमनसाहेबांना तुम्ही दिसायला नको."

शरदराव थोड्या दूर अंतरावर उन्हातच उभे राहिले. आजूबाजूला कुठेही सावली नव्हती. थोडा वेळ म्हणता म्हणता एक तास उलटून गेला. पाय दुखायला लागले म्हणून शरदराव तिथेच एका तापलेल्या दगडावर बसणार तोच गेटचा आवाज आला. बहुदा मिटींग संपली असावी.

चेअरमनसाहेबांच्या पाठोपाठ अधिकारी आणि त्यांच्यासोबत राहूलही बाहेर आला. उभ्या असलेल्या वडिलांकडे पाहून तो मनात चरफडला.

चेअरमनसाहेबांनी गाडीचं दार उघडलं आणि बसता बसता त्यांचं लक्ष शरदरावांकडे गेलं. गाडीत न बसता ते तसेच बाहेर थांबले.

"ते समोर कोण उभे आहेत?" त्यांनी सिक्युरिटीला विचारलं.

"आपल्या राहूल साहेबांचे वडील आहेत. जेवणाचा डबा द्यायला आलेत." सिक्युरिटीने घाबरल्या आवाजात सांगितलं.

"बोलवा त्यांना."

नको ते घडलं होतं. राहूलच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. संताप आणि भीतीने डोकं फुटेल असं त्याला वाटू लागलं.

सिक्युरिटीने आवाज दिल्यावर शरदराव जवळ आले. चेअरमनसाहेब पुढे होऊन त्यांच्याजवळ गेले.

"तुम्ही पाटील सर ना? डी.एन. हायस्कूलमध्ये तुम्ही शिक्षक होता?"

"हो. तुम्ही कसं ओळखता मला?"

काही कळायच्या आत चेअरमनसाहेबांनी शरदरावांचे पाय धरले. सगळे अधिकारी आणि राहूलही ते दृश्य पाहून अवाक् झाले.

"सर, मी अतिश अग्रवाल. तुमचा विद्यार्थी होतो. बघा तुम्ही मला घरी शिकवायला यायचात."

"हो. हो. आठवलं. बाप रे बरेच मोठे झालात की तुम्ही..."

चेअरमन हसले. मग म्हणाले, "सर तुम्ही इथे उन्हात काय करताय? चला आतमध्ये बसू. खूप गप्पा मारायच्यात तुमच्याशी. सिक्युरिटी तुम्ही यांना आत का नाही बसवलंत?" सिक्युरिटीने शरमेने मान खाली घातली.

ते पाहून शरदरावच म्हणाले, "त्यांची काही चूक नाही. तुमची मिटींग चालू होती. तुम्हांला त्रास नको म्हणून मीच बाहेर थांबलो."

"ओके... ओके...!"
चेअरमनसाहेबांनी शरदरावांचा हात धरला आणि ते त्यांना आपल्या आलिशान चेंबरमध्ये घेऊन गेले. "बसा सर." आपल्या खुर्चीकडे बोट दाखवत चेअरमन म्हणाले.

"नाही. नाही. ती खुर्ची तुमची आहे." शरदराव गडबडून म्हणाले.

"सर, तुमच्यामुळे ती खुर्ची मला मिळालीय्. तेव्हा पहिला हक्क तुमचा."

चेअरमनसाहेबांनी बळजबरीनेच त्यांना आपल्या खुर्चीत बसवलं.

"तुम्हांला माहीत नसेल पवार सर.." जनरल मॅनेजरकडे पाहत चेअरमन म्हणाले, "पाटील  सर नसते तर आज ही कंपनी नसती आणि मी माझ्या वडिलांचं धान्याचं दुकान सांभाळत बसलो असतो."

राहूल आणि जी.एम. दोघंही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिले.

"शाळेत असताना मी अतिशय 'ढ' विद्यार्थी होतो. कसाबसा ढकलत शाळेने मला नववीपर्यंत आणलं. शहरातल्या सर्वोत्तम क्लासेसमध्ये मला टाकलं गेलं. पण मला शिकण्यातच गोडी नव्हती. त्यातून श्रीमंत बापाचा लाडका लेक. दिवसभर शाळेत माऱ्यामाऱ्या करायच्या. आणि संध्याकाळी क्लासेस चुकवून मुव्ही पाहायच्या हे माझे उद्योग. आईला ते सहन होईना. त्या वेळी पाटील सर कडक शिस्तीचे आणि उत्कृष्ट शिकवणारे म्हणून प्रसिद्ध होते. आईने त्यांच्याकडे जाऊन मला शिकवण्याची विनंती केली. पण सरांच्या छोट्याशा घरात बसायला जागा नव्हती, म्हणून सरांनी नकार दिला. आईने सरांच्या विनवण्या केल्या आणि आमच्या घरी येऊन शिकवायची विनंती केली. मागाल ती फी देण्याची तयारी दाखवली. सरांनी फी घ्यायला नकार दिला पण आढेवेढे घेत घरी येऊन शिकवायला तयार झाले. पहिल्या दिवशी सर आले. मी नेहमीप्रमाणे खोड्या करायला सुरुवात केली. सरांनी मला चांगलं बदडून काढलं. मी मुकाट्याने बसायला सुरुवात केली. तुला सांगतो राहूल पहिल्याच आठवड्यात मला अभ्यासात गोडी वाटायला लागली. नंतर तर अभ्यास केल्याशिवाय मला करमायचं नाही. सर इतके छान शिकवायचे इंग्लिश, गणित, सायन्स हे विषय जे मला कठीण वाटायचे ते खूप सोपे वाटायला लागले. सर कधी आले नाहीत तर मला अस्वस्थ वाटायचं. नववीत मी वर्गात दुसरा आलो. आईवडिलांना खूप आनंद झाला. मी तर हवेत तरंगत होतो. दहावीत मी सगळे क्लासेस सोडले आणि फक्त पाटील सरांकडे शिकू लागलो. आणि दहावीत मेरीटमध्ये येऊन मी सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला."

"माय गुडनेस...! पण सर मग तुम्ही सरांना तरीसुद्धा फी दिली नाहीत?" जनरल मॅनेजरनी विचारलं.

"मी आईवडिलांसोबत सरांकडे पेढे घेऊन गेलो. वडिलांनी सरांना एक लाखाचा चेक दिला. सरांनी तो घेतला नाही. सर त्या वेळी काय म्हटले ते अजूनही माझ्या लक्षात आहे. ‌सर म्हणाले, 'मी काहीही केलेलं नाही. तुमचा मुलगाच हुशार होता. मी फक्त त्याला मार्ग दाखवला. आणि मी ज्ञान विकत नाही, मी ते दान करतो'. नंतर मी सरांच्या मार्गदर्शनाखालीच बारावीत परत मेरीटमध्ये आलो. पुढे बी. ई. झाल्यावर मी अमेरिकेत जाऊन एम.एस. केलं. आणि आपल्याच शहरात ही कंपनी सुरू केली. एका दगडाला सरांनी हीरा बनवलं. आणि मीच नाही तर सरांनी असे असंख्य हिरे घडवले आहेत. सर तुम्हांला कोटी कोटी प्रणाम...!!"

चेअरमनसाहेबांनी डोळ्यांत आलेलं पाणी रुमालाने पुसलं.
‌"पण कमालच म्हटली पाहिजे. बाहेर शिक्षणाचा आणि ज्ञानदानाचा बाजार भरलेला असताना एक रुपया न घेता हजारो विद्यार्थ्यांना शिकवणं, नुसतं शिकवणं नाही तर त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करणं. व्वा सर, मानलं तुम्हांला..." शरदरावांकडे पाहत जी. एम. म्हणाले.

‌"अहो सर, ही माणसं तत्त्वनिष्ठ होती. पैशाची, मानसन्मानाची भुकेली नव्हती. विद्यार्थ्यांचं भलं व्हावं हा एकमेव उद्देश असायचा." चेअरमनसाहेब म्हणाले.

"माझे वडिलही त्यातलेच. 'एक वेळ उपाशी राहू, पण धान्यात भेसळ करून विकणार नाही' हे त्यांचं तत्त्व होतं. आयुष्यभर त्यांनी ते पाळलं. सचोटीचा व्यापार केला. त्याचा फायदा आज माझ्या भावांना होतोय."

‌बराच वेळ कुणी बोललं नाही. मग चेअरमननी शरदरावांना विचारलं, ‌"सर, तुम्ही घर बदललंय की त्याच घरात राहता?"

‌"त्याच जुन्या घरात राहतोय् सर!"
‌शरदरावांऐवजी राहूलनेच त्यांचं उत्तर दिलं. त्या उत्तरातील वडिलांविषयीची चीड चेअरमनसाहेबांच्या लगेच लक्षात आली.

‌"ठरलं तर मग. सर आज मी तुम्हांला गुरुदक्षिणा देणार आहे. याच शहरात मी काही फ्लॅटस् घेऊन ठेवलेत. त्यांतला एक थ्री बीएचकेचा फ्लॅट तुमच्या नावावर करतोय सर...!"

‌"काय्य?" शरदराव आणि राहूल एकाच वेळी ओरडले. ‌"नको नको. एवढी मोठी गुरुदक्षिणा मला नकोय." शरदराव निग्रहाने म्हणाले.

‌चेअरमनसाहेबांनी शरदरावांचे हात हातात घेतले. ‌"सर, प्लीज.. नाही म्हणू नका आणि मला माफ करा. कामाच्या व्यापात तुमची गुरुदक्षिणा देण्यात मी खूप उशीर केला."

‌मग राहूलकडे पाहत त्यांनी विचारलं, ‌"राहूल तुझं लग्न झालंय?"

‌"नाही सर, ठरलंय. पण जोपर्यंत मोठं घर होत नाही तोपर्यंत लग्न होणार नाही अशी सासरच्यांची अट होती. त्यामुळे अजून तारीख नक्की केली नव्हती आणि हाॅलही बुक केला नव्हता."

‌चेअरमननी फोन उचलला. कोणाशी तरी बोलले. मग समाधानाने फोन खाली ठेवून म्हणाले. ‌"तुमच्या मंगल कार्यालयाचं काम झालं. सागर लाॅन्सं माहित आहे ना?"

‌"सर, ते तर खूप महाग..."

‌"अरे, तुला कुठे पैसे द्यायचे आहेत? ‌अरे, सरांचे विद्यार्थी सरांसाठी काहीही करू शकतात. सरांनी फक्त शब्द टाकायला हवा. पण सर तत्त्वनिष्ठ आहेत ते तसं करणार नाहीत. या लाॅन्सचा मालक सरांचाच विद्यार्थी आहे. त्याला मी शब्द टाकला. नुसता हाॅलच नाही, तर जेवणासकट संपूर्ण लग्नच लावून द्यायची जबाबदारी त्याने घेतलीय... तीही मोठ्या आनंदाने. तुम्ही फक्त तारीख सांगा आणि सामान घेऊन जा."

‌"खूप खूप धन्यवाद सर!" राहूल अत्यानंदाने हात जोडत म्हणाला.

‌"धन्यवाद मला नाही तुझ्या वडिलांना दे राहूल! ही त्यांचीच पुण्याई आहे. आणि मला एक वचन दे राहूल, सरांच्या अंतिम श्वासापर्यंत तू त्यांना अंतर देणार नाहीस आणि त्यांना दुखावणार नाहीस. मला फक्त कळू दे तू त्यांना त्रास देतो आहेस. या कंपनीतून तुला डच्चू तर मिळेलच पण अख्ख्या महाराष्ट्रात तुला कुठे नोकरी मिळणार नाही याची मी व्यवस्था करीन." चेअरमन कठोर आवाजात म्हणाले.

‌"नाही सर. मी वचन देतो तसं होणार नाही." ‌राहूल हात जोडत म्हणाला.
‌संध्याकाळी राहूल घरी आला तेव्हा शरदराव पुस्तक वाचत होते. पुष्पाबाई जवळच भाजी निवडत होत्या. राहूलने बॅग ठेवली आणि शरदरावांचे पाय धरले.

‌"नाना, मी चुकलो. मी तुम्हांला वाटेल ते बोलत होतो. मला माहीत नव्हतं नाना तुम्ही इतके मोठे असाल."

‌शरदरावांनी त्याला उठवून छातीशी धरलं.

‌आपला मुलगा का रडतोय हे पुष्पाबाईंना कळेना. पण काहीतरी नक्कीच चांगलं घडलयं म्हणून तर बापलेकात प्रेम उमळून आलंय हे पाहून त्यांचेही डोळे अश्रूंनी भरून आले.
.....................................
*एक विनंती*
  ☝ *वरील कथा वाचल्यावर तुमच्या डोळ्यातुन अश्रुचा १ थेंब जरी ओघळला असेल तरच हि पोष्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा ! ✍✍✍✍✍✍ आणि कृपा करुन आपल्या बापाला कधी कोणी विचारु नका काय केलेस काय कमवून ठेवले माझ्यासाठी , जे कमवायचे आहे ते स्व;ता कमवा, त्यांनी जे शिक्षण व संस्कार दिले आहेत ते तेच तुम्हाला कमवायला शिकवतील*
😊😊😊😊😊😊😊😊😊😊

 


कमेंट करायला विसरू नका व सबस्क्राइब करा
😊😊😊😊😊😊😊😊😊😊

रविवार, २१ जून, २०२०

जून २१, २०२०

दुर्लक्ष झालेला बाप

       आपल्या वडिलांचं घरात असणे किती महत्त्वाच आहे . हे वडील नसल्यावरच कळतं . पोस्ट पूर्ण वाचा म्हणजे वडिलांची किंमत कळेल.



            *वडील*

त्यांच्या खांद्यावर बसून
जग दिसतं आपल्याला नवं नवंच
आयुष्यभर घरासाठी
वडील होऊन राहतात कवच

सावरण्यासाठीच असतात
त्यांचे मजबूत हात
असतात वडील तोवर
जाणवत नाहीत आघात

ऊन वारा पाऊस झेलत
वडील लकाकी हरवून जातात
उडून जातात पाखरं तेव्हा
वडील एकाकी होऊन जातात

दाटून येतो कंठ गळ्यात
पण अश्रू पापणीतून गळत नाही
आपण वडील झाल्याशिवाय
मोठेपण त्यांचं कळत नाही
----------------------------------
               
          💐    वडील  💐
बायको "गोड बातमी" सांगते ते
   ऐकून टचकन डोळ्यात पाणी येते 
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••

   नर्सने ओंजळीत ठेवलेला काही 
   पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड 
   ओझ्याची जाणीव करून देतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••

   बायकोबरोबर जागवायच्या रात्री 
   डायपर बदलणे आणि पिल्लाला 
   कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात 
   व्यतीत होउ लागतात,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••

   मित्रांबरोबरच्या पार्ट्या आणि नाके 
   नीरस वाटून संध्याकाळी पावलांना 
   घराची ओढ लागते,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

   "लाईन कोण लावणार" म्हणत 
   सिनेमाची टिकिटे टेचात ब्लॅकने 
   खरेदी करणारा तोच जेव्हा शाळेच्या 
   फॉर्मच्या लायनीत पहाटे पासून 
   तासंतास इमानदारीत उभा रहतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

   ज्याला उठवताना गजर हात टेकतात 
   तोच जेव्हा पिल्लाचा नाजुक हात किंवा 
   पाय झोपेत आपल्या अंगाखाली येऊ 
   नये म्हणून रात्रभर सावध झोपू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••

   खऱ्या आयुष्यात एका झापडित 
   कुणालाही लोळवू शकणारा पिल्लाबरो-
   बरच्या खोट्या फाइटिंग मध्ये त्याच्या 
   नाजुक चापटीनेदेखील गडाबडा लोळतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••••

   स्वतः कमीजास्त शिकला असला तरी 
   पोराला "नीट अभ्यास कर रे" असे 
   पोट तिडकिने सांगू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••••

   आपल्याच कालच्या मेहनतीच्या 
   जोरावर आपला आज मजेत जगणारा 
   अचानक पोराच्या उद्यासाठी आपलाच 
   आज कॉम्प्रोमाइज करू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••••

   ऑफिसात अनेकांचा बॉस बनून 
   हुकुम सोडणारा शाळेच्या POS मध्ये 
   वर्गशिक्षिकेसमोर कोकरु बनून, 
   कानात प्राण आणून तिच्या इंस्ट्रक्शन्स 
   आज्ञाधारकपणे ऐकत असतो.
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••

   आपल्या अप्रेझल आणि प्रमोशन-
   पेक्षासुद्धा तो शाळेच्या साध्या 
   यूनिट टेस्टच्या रिझल्टची देखिल 
   जास्त काळजी करू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••

   आपल्या वाढदिवसाच्या ट्रीट पेक्षा 
   पोराच्या बर्थडे पार्टीच्या तयारीत 
   तो गुंगुन जातो,
  तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

   गाडीतून सतत फिरणारा तो 
   पोराच्या सायकलची सीट पकडून 
   सायकलच्या मागे धावू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••

   आपण पाहिलेली दुनिया, केलेल्या 
   चूका पोराने करू नयेत म्हणून 
   प्रिचिंग सुरु करतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••

   प्रसंगी पोराच्या कॉलेज अडमिशनसाठी 
   पैशाची थैली सोडतो किंवा याचनेकरिता 
   "कॉन्टेक्ट्स" समोर हात जोडतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

   "तुमचा काळ वेगळा होता, आता 
   जमाना बदलला, तुम्हाला काय कळ-
   णार नाही. This is generation gap!" 
   असे आपणच केव्हातरी बोललेले संवाद 
   आपल्यालाच ऐकू आल्यावर आपल्या 
   बापाच्या आठवणीने हळवा होऊन मना-
   तल्या मनात त्याची माफी मागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••

   पोरगा शिकून परदेशी जाणार, 
   मुलगी लग्न करून परक्या घरी 
   जाणार हे दिसत असून त्याकरिता 
   स्वतःच प्रयत्न करतो 
   तेव्हा तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••

   पोर मोठी करताना आपण कधी 
   म्हातारे झालो हे लक्षात येत नाही 
   आणि लक्षात येते तेव्हा उपयोग नसतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••

   कधी पोरांच्या संसारात अडगळ बनून, 
   कधी आपल्या म्हातारीबरोबर वृद्धा-
   श्रमाची पानगळ बनून अगदीच नशीब-
   वान असला तर नातवंडांसमवेत चार 
   दिवस रमून•••••••कसेही असले तरी 
   भावी पिढीला भरभरून आशीर्वाद देत 
   कधीतरी सरणावर चढतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••••!!

    •••••••तमाम वडिलांना समर्पित. ..!!

(संग्रहित)

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


                *BABA*
 
लहान असल्यापासून आई मुलांना 
सांगत असते.......

इथे जाऊ नको-------बाबा मारेल,
तिथे जाऊ नको------बाबा मारेल
झाडावर चढू नको---बाबा मारेल,
नदीकडे जाऊ नको--बाबा मारेल,
शाळेत जा नाहीतर--बाबा मारेल

अभ्यासाला बस नाही तर
.............................बाबा मारेल
हे करू नको नाही तर........................ बाबा मारेल,
ते करु नको नाही तर.........................बाबा मारेल.

मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात. 

बाबांच्या भयाने शाळेत जातात.

बाबाने मारु नये म्हणून अभ्यास करतात.

बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात.

हळू हळू मुलं बाबां कडे दुर्लक्ष 
करुन आई वरच प्रेम करु लागतात.

मना मधून बाबांना काढून टाकतात.
आणि आईच्या चरणावर   सर्वस्व अर्पण करतात.

बाबां पासून चार हात लांबच राहतात.
मुलं आईच गाणं गातात.
मुलं आई वर कविता लिहितात. 

कोणतंच मुल बाबाला दुधा वरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासरांची गाय म्हणत नाही. 

बाबांसाठी मुलाकडे 'शब्दच' नसतात.

मुलाच्या पायाला ठेच लागली तरीही मुले "बापरे" म्हणत नाहीत.

स्वामी तिन्ही जगाचा "बाबांविना"
भिकारी होत नाही.

साने गुरुजीनांही "श्यामचा बाप" दिसत नाही.

आई घरात असली कि, घर कस भरल्यासारखं वाटतं.

मुलांना बाबा घरात असला की, मात्र स्मशान शांतता..................... !

मुलं शप्पथ सुद्धा आईचीच घेतात.
बाबा शप्पथेच्याही लायकीचा नसतो.

बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या व आडनावाच्या मध्ये..........."नावापुरता"!

मुलं विठोबाला 'माउली' म्हणतात
धरणीला 'माय' म्हणतात. आणि देशाला 'माता' म्हणतात........ !

बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाच झालेला असतो हद्दपार................  !

बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा........

बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुल बुआ.............

बाबा म्हणजे केवळ रुपये, पैसे कमवण्याचे यंत्र. 

तेवढं.........काम त्याने केलं की, त्याचं कर्तृत्व संपलं.........

असं असूनही बाबा मेल्यावर..........
मुलांच्या छातीत धडकी का भरते ????????? 

का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस.....!

का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्या सारखी..........!

का वाटत मुलांना की आपण बेवारस झाल्या सारखं....!

का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर......!
का मुलं घाबरतात बाबा मेल्यावर...............!

कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा "पत्थरदिल" बाबा..................
प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो,
तेव्हा का वाटत मुलांना की, ...........................

जी डोळे मिटून प्रेम करते त्याला प्रियकर म्हणतात. जी डोळे उघडून प्रेम करते त्याला मैत्रीण म्हणतात. जी डोळे बंद करून प्रेम करते त्याला बायको म्हणतात. आणि जी स्वतःचे डोळे बंद होईपर्यंत प्रेम करते त्याला "आई" म्हणतात. परंतु.
                      पण 
 डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो, त्याला पिता म्हणतात...
 
१ शेअर बाबांसाठी
पोस्ट आवडल्यास आपल्या फेसबूक इंस्टाग्राम  व्हाट्सअप  इत्यादी सोशल नेटवर्कवर इतरांना नक्की शेअर करा व त्यांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या . सबस्क्राइब करायला विसरू नका 


                       धन्यवाद

                                 - 
🌹🌹🌹🌹🌹

शुक्रवार, १९ जून, २०२०

जून १९, २०२०

वडील

कृपया  हा लेख पूर्ण वाचा फारच छान लिहिलेला आहे 
*बापाला बघितलं आहे का?

मोठा झाल्यापासुन बापाला,
कधी मिठी मारून बघितलं आहे का? 
मारून बघा, 
ह्रुदय स्थिर होऊन जाईल.

मोठा झाल्यापासुन कधी 
बापाचा मुका घेऊन बघितला आहे का? 
घेऊन बघा, 
बापाची दाढी गालाला रुतल्यावर, 
बापा पेक्षा आपण अजुन छोटच आहे, 
याची जाणीव होऊन जाईल .

बापाची चप्पल होते म्हणुन कोणी बाप होत नाही, 
त्यासाठी आयुष्यभर दुय्यम स्थान घ्याव लागत , 
कधी घेऊन बघितलं आहे का  दुय्यम स्थान ? 
घेऊन बघा, 
बापाची किंमत कळुन जाईल .

बापाला बुढा, म्हातारा अस म्हणुन बघितल, 
साधु लोकांना बाबा म्हंटल, 
कधी बापाला बाबा म्हणुन बघितलं आहे का ? 
म्हणुन बघा, 
खऱ्या संतांची ओळख होऊन जाईल.

बापाचं घरावर नाव नाही, 
बापाचं हातावर नाव नाही, 
बापाचं छातीवर नाव नाही, 
बापाचं गाडीवर नाव नाही, 
स्वतःच्या घरात असुन देखील तो परका , 
कधी परका होऊन बघितला आहे का ? 
होऊन बघा, 
बाप किती खंबीर आहे याची जाणीव होऊन जाईल.

आई च प्रेम जास्त आणि बाबाचं कमी अस कधी नसत .
कधी सुर्य आणि चंद्र यांच्यातला 
साम्य बघितलं आहे का ? 
बघुन घ्या,  
दोघ ही प्रकाश देतात फक्त 
वेळा वेगवेगळ्या असतात.

बाप फक्त पाया पडण्यापुरता नसतो, 
त्याला कधी निरखून बघितलं आहे का ?
निरखून बघा, 
आयुष्यातील सर्वात मोठा मित्र तुमच्या समोर असतो.

*अशीच एक छोटीशी गोष्ट*

*एका पित्याने* आपल्या *मुलीचे* खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं. *खूप चांगल्या प्रकारे तिचे शिक्षण केलं*...   जेणेकरून मुलीच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होईल.......

*काही काळानंतर ती मुलगी एक यशस्वी व्यक्ती बनली.*

आणि *एका मल्टी नैशनल कंपनीची सी.ई.ओ. झाली. उच्च पद ,भरपूर वेतन, सगळ्या सुख सुविधा तिला कंपनीकडून प्रदान झाल्या होत्या.*

*एके दिवशी असाच तिचा विवाह एका चांगल्या मुलाशी झाला तिला मुलंही झाली. तिचा आता आपला सुखी परिवार बनला.* 

*वडील म्हातारे होत चालले होते* एक दिवस वडीलांना आपल्या मुलीला भेटायची इच्छा झाली.. आणि ते मुलीला भेटायला तिच्या ऑफिस मध्ये गेले. *त्यांनी बघितलं की मुलगी एका मोठ्या व शानदार ऑफिसची अधिकारी बनलीय. तिच्या ऑफिसात हजारो कर्मचारी तिच्या अधीन राहून काम करत आहेत.* 

*हे सगळं बघून वडीलांची छाती अभिमानानं फुलली !*

ते म्हातारे वडील मुलीच्या कॅबिन मध्ये गेले. व *तिच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहीले.* आणि प्रेमानं त्यांनी आपल्या मुलीला विचारलं की..... *"या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?* 
मुलगी स्मित हास्य करत, आत्मविश्वासाने म्हणाली. *"माझ्याशिवाय कोण असू शकतं बाबा ?"*

वडीलांना तिच्याकडून ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती. त्यांना विश्वास होता की, त्यांची मुलगी गर्वाने म्हणेल की,,,,, 
*" बाबा, ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तुम्हीच आहात. ज्यांनी मला एवढ्या योग्यतेचं बनवलं!"*
या विचाराने त्यांचे डोळे भरून आले. ते कॅबिनचा दरवाजा ढकलून बाहेर निघायला लागले. *पण न राहून त्यांनी परत एकदा वळून मुलीला विचारलं की,,,, परत सांग "या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?* 

मुलगी ह्या वेळेस म्हणाली की,,,, *"बाबा, तुम्हीच आहात ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती!"*


*वडील हे ऐकून आश्चर्यचकित झाले.....* व ते म्हणाले,,,, अगं, आताच तर तू *स्वतःला* जगातली सगळ्यात *शक्तिशाली* व्यक्ती म्हणत होतीस.... आणि आता *तू मला शक्तिशाली व्यक्ती* म्हणून सांगते आहेस ?"

मुलगी हसत त्यांना आपल्या समोर बसवत बोलली,,, *"बाबा, त्यावेळी तुमचा हात माझ्या खांद्यावर होता.* 

*ज्या मुलीच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल. तर ती मुलगी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीच असेल ना? हो की नाही बाबा!"* 

वडीलांचे डोळे परत भरून आले. त्यांनी आपल्या मुलीला घट्ट छातीशी धरून करकचून मिठी मारली."....


खरंच आहे की,,,,,, *ज्याच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल....ती व्यक्ती जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असते.*


*आपल्या प्रगती व उन्नतीने फक्त "आई-वडीलच " आपल्या प्रगतीवर खुश असतात.*.........🙏🏻🌹

😢पोस्ट वाचून झाल्यावर नक्की शेअर करा व इतरांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या तसेच ब्लॉग ला सबस्क्राइब करायला विसरू नका म्हणजे नवीन पोस्ट टाकल्यानंतर लगेच तुम्हाला माहिती मिळेल धन्यवाद.

    !*
🙏🏻😷🙏🏻😷🙏🏻😷

💐

रविवार, १४ जून, २०२०

जून १४, २०२०

वडिलांचे मुलास पत्र

बापानं वयात येणा-या मुलाला लिहिलेलं पत्र त्याचा हा मराठी अनुवाद.)_*

*_एका वडिलांनी मुलाला पत्र_*

_नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा.....पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी कि ज्यावेळी जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल._

_"माझ्या लाडक्या मुला.मी हे असं तुला पत्र लिहितोय बघ, वाच, आणि ठरव...._

           _जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अतर्क्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बऱ्या._
       
        _मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार._
      
         _मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय._
     
            _माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे._ _तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस._
       
         _जगणं कशानेच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही._

       _आयुष्य फार छोटं आहे आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा._

         _प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणोही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस._

      _अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच ! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना._

_माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचा._

      _आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही._

            *_- तुझा बाबा_*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 कृपया पोस्ट वाचून झाल्यानंतर आवडल्यास नक्की शेअर करा व इतरांनाही वाचण्याचा आनंद घेऊ द्या.